Saturday, March 14, 2020

माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो, 

कृपया लक्ष देवून वाचा व समजून घेण्याचा प्रयत्न करा.. हीच विनंती, तरीही कही चूक झाल्यास क्षमस्व!!

जेव्हा देश स्वतंत्र होता व प्रत्येक प्रांताचे  वेगवेगळे राजे राज्य करीत होते तेव्हा  या भारताची या हिंदू राष्ट्राची विविधता- सौंदर्य - समृद्धि, बघुन परकीयांनी आक्रमण केले व या देशावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुद्धा काही लोकांच्या फितूरीमुळे, देश द्रोही व गद्दारी मुळे या देशाचे हाल - हाल झाले स्वताच्याच देशातील लोकांना म्हणजेच स्वकीय हिंदुना साथ न देता परकीयांना साथ देवून कित्येक फितुरांनी हा देश विकला स्वहस्ते परकीयांच्या स्वाधीन केला।  तेव्हाही बरेच वर्ष गुलामगिरित राहून त्यांच्या जाणिवा लुप्त झाल्या, लोकांचा आत्मा /जमीर जागेच होत नव्हते। त्यात काही होते जे - 'मसीहा' येण्याची वाट बघत होते  व  काही फक्त पंढरपेशी लोक होते जे -"माझे निभतेय ना मग लोकांना मिळत नाही याचे मला काय?" - या वृत्तीचे होते।  हे असे लोक कधीच कुणाचा विचार करीत नाहीत, फक्त मिरवायचे, दुसऱ्यांच्या फंदात पडून काय  मिळते ?? या वृत्तीचे फ़क्त नी फ़क्त स्वताचा विचार करणारे व  स्वताचा फायदा बघणारे।  

आपला देश पारतंत्र्यात होता तेव्हा पासुनच या देशात फितूरी, गद्दारी, चापलूसी, स्वार्थ वृत्ति आणि पांढरपेशीपणा (मरू देत त्यांना मला काय करायचे - हि वृत्ती )  हे समाजाला व देशाला लागलेले रोग आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही अनाजी पंत, काणोजी शिर्के सारखे कितीतरी स्वताला चांगले म्हणवून घेणारे पंढरपेशी गद्दार होते ज्यांच्या स्वार्थपूर्ति साठी त्यांनी कुणाचाच विचार केला नाही। ... व शिवजी महाराजांनी स्थापन केलेले व संभाजी महाराजांनी सांभाळलेले  स्वराज्य मुस्लिमांच्या व इंग्रजांच्या हाती गेले.... 

१९४७ ला कित्येकांच्या बलिदानानन्तर स्वातंत्र्य सुर्य उजाडला पण त्याला देशातील स्वार्थ साधूंनी जपले नाही, आप्पलपोटी  नेत्यांनी स्वार्था पोटी देशाला देशोधडीला लावण्या इतपत मजल गाठली,....देशाचे तुकडे केले व महान झाले, देशातील खऱ्या क्रांतिकारकांना बाजुलाच ठेऊन स्व:ता मोठेपण घेतले व चुकीचे निर्णय घेवुन नेहरू- गांधी  व त्यांची आपलपोटी  कांग्रेस यांनी  ६० वर्षात देशाचे लचके तोडले... 

२०१४ मधे देशाला परत एक शिवाजी लाभले - 'नरेंद्र मोदी' न्यू जनरेशनचे  "शिवाजी राजे"  त्यांनी देशाला सावरले, परकीय संबंध वाढवले, गुंतवणूक वाढवली, देशाची वित्तिय परिस्थिति सुधारली, देशाला स्वच्छ व डिजिटल बनवण्याचे प्रयत्न सुरु केले, हिंदूंचा अत्यंत महत्वाचा - हजारो वर्षांचा श्रीराम मंदिराचा प्रश्न सोडवला व निर्णय हिंदु साठी दिला, कश्मीरवर वारंवार हमले करणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्या देशात घुसून मारले, चंद्रयान सारखे प्रोजेक्ट्स स्वता जातीने बघितले, नोटबंदी  करून भ्रष्टाचाराला आळा घातला  व आता  CAA  कायदा आणून आपल्या देशाची सेफ्टी व सुरक्षितता मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर त्यांच्या वर कित्ती आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत।।।।

आणि आपल्यातले कितीतरी पांढरपेशी लोक याकडे लक्ष देत नाहीत, व्हाट्सप्प ग्रुप व सोशल मिडिया ह्या फालतू गोष्टीं डिसकस करण्यासाठी साठी नाहीत असे वक्त्यव्य करतात ... म्हणजे त्यांना देशाच्या सुरक्षिततेशी काहीच घेणे देने नाही।
हीच लोक़ स्वताच्या सोसयटीत कुणाला परक्यांना विना परवानगी व शहानिशा केल्याशिवाय शिरण्याची/घुसण्याची बंदी करतात। का तर त्रास होऊ नये व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी। CCTV कॅमेरे पण लावतात सोसयटीच्या सेफ्टी साठी चोरांनी आत येऊ नये म्हणून ....
पण देशात मात्र कुणीही कधीही घुसपेठी करायची का ??  यायचे चोरया - मारया करायच्या व उघड़ छातीने फिरायचे  हे कैसे कुणाला मान्य हो शकते याचेच आच्छर्य  वाटते .... कारण अश्या छोट्या -  छोट्या सोसाइटयांनीच तर देश बनतो ना ?? आपल्या सोसायटीची सुरक्षा जशी आवश्यक आहे तशीच देशाची सुरक्षा आवश्यक नाही का??  देश सुरक्षित राहिला तर तरच सोसायटी सुरक्षित राहील, गांव सुरक्षित राहील.......बरोबर ना ?? 
मग सांगा देशात घुसणाऱ्या /आलरेडी घुसलेल्या लोकांची नको का शहानिशा व्हायला ??? 
त्यांचे कागदपत्र, ओळख पत्र नकोत का तपसायला ?? आणि हे सगळ कुणासाठी देशात राहणाऱ्या देशवासियांच्या सुरक्षिततेसाठीच ना ?? 
आपल्याच सुरक्षेचा प्रश्न असूनही आपणच त्याच्या विरोधात वागायचे का?? 

का हे दर्शवायचे की मला त्याच्याशी काहीच घेणे देने नाही, काय गोंधळ घालायचा तो ते मोदी घालत बसोत, मला उगीच मध्ये पडायचे नाही... मी इकडूनही बोलत नाही न तिकडूनही नाही.. 

मला एक सांगा सोशल मिडिया, व्हाट्सअप ग्रुप फ़क्त फोटोज, डीपी, जोक्स एंड टिकटॉक विडिओ बघण्यासाठीच आहे का ??  
मुळीच  नाही !!   व्हाट्सअप ग्रुपच नाही तर सम्पूर्ण सोशल मीडिया वेळ पडली तर आपल्या सर्व बंधू-भगिनींना सावध करण्यासाठी व जागरूक करण्यासाठी पण आहे.... 
नव्हे अश्या वेळी तर फ़क्त जागरुकते साठीच आहे...... 
कारण देशाच्या सुरक्षिततेचा सवाल असतांना, आपल्या सारख्या सुशिक्षित जन सामान्यांचे कर्तव्य आहे की स्व:ता जागरूक असणे व दुसऱ्यांना पण जागरूक करणे...... 

जागे व्हा !! आपण हिंदू !! आपण मराठी - मराठी मनाला 'श्री शिवाजी महाराजांचा ' नेहिमच अभिमान वाटतो ... 
याच शिवबाच्या मराठी प्रांतात, मुठभर लोक औरंग्या सारख्या खुनशी व मुसलमान बादशहाला 'संत' म्हणवुन घेण्यासाठी आंदोलन करतात - हे आपण  मराठी भारतीयांनी का खपवुन घायचे??
तूम्हिच सांगा ??? परमुलक्याच्यां आक्रमणामुळे एवढे वर्ष आपण जूलूम सहन केला, तेव्हा एका मराठी वीराने (शिवजी राजे) शुन्यातून सेना उभी करुन हे राज्य स्थापीत केले .. व संपुर्ण जगला 'स्वराज्य' म्हणजे काय ते दाखवून दिले ...आज संपूर्ण जगात फक्त एकुलते-एक हिंदु राष्ट्र आहे - 'भारत' आणि त्यातल्या हिंदुनिच जर हिंदुत्वा ला समर्थन नाही केले, साथ नाही दिली तर कोण देईल/कोण करेल ??? 
राजे शिवाजी- संभाजींच्यावेळी जी चुक अनाजी पंत, शिर्के आणि ईतर राज द्रोह्यांनी केली तशीच चुक परत होवु नये असे वाटते...

आपण हिंदु लोक जर आपल्याच विरोधात आंदोलन करीत रहिलोत तर आपल्या पुढच्या पिढीला मोकळा श्वास घायल्या आपले हे एकुलते- एक स्वतंत्र हिंदु राष्ट्र राहील का हो ??
आपली मुल- मुली स्वतंत्र जगु शकतील का ??? याचा विचार नको का करायला एका सुशिक्षित भारतीय व्यक्तिने ???

आपल्या सारख्या सुशिक्षित जन सामान्यांचे कर्तव्य आहे की स्व:ता जागरूक असणे व दुसऱ्यांना पण जागरूक करणे......  जागे व्हा !!  

No comments:

Post a Comment